--> निसर्ग माझा मित्र | MyselfEssay

निसर्ग माझा मित्र

nisarg maza mitra, nisarg apala sobati, nisarg vachava, paryavbanache rakshan, झाडांचा अपमृत्यू टाळा,

निसर्ग माझा मित्र 


             निसर्ग हा आपला खरा मित्र आहे. निसर्ग प्रत्येकाशी एकनिष्ठ राहतो. हे माणसासारखे आपले निष्ठा कधीही बदलत नाही. निसर्ग नेहमीच व्यापकपणे आणि आनंदाने आमच्याबरोबर भेटतो. 


    निसर्ग आपला सोबती
    !










            आज वृक्षतोडीमुळे पक्षी व प्राण्यांची सावली हिरावली जात आहे. माणसाला जसा या वृक्षतोडीमुळे त्रास सहन करावा लागतो आहे. त्यापेक्षाही कितीतरी जास्त पक्ष्यांना त्रास होतो आहे. कावळा देखील काव - काव करीत म्हणतो आहे कि, अरे माणसा एक तरी झाड लाव, एक तरी झाड लाव. 

     

          तुकाराम महाराजाच्या मनन व चितनात वृक्ष, वेली व वनचर हे सगे सोयरे आहेत. मग त्यांच्यावर प्रहर का करता? आज पाऊस लांबला आहे. याचे कारण उघडेबोडके जंगल हाच आहे. निसर्गातील सौंदर्य सर्वांना स्फूर्ती, आनंद आणि चैतन्य देते. निसर्गाच्या सानिध्यात अपार सौख्याचा लाभ होतो. 

     

           शेतातून जाणारी एखादी पायवाट, पुढे तो औदुंबराचा वृक्ष व भर उन्हात त्या झाडाची सावली अंगावरुन हात फिरविल्या सारखे वाटते. खरोखरच निसर्गातील हे सौंदर्य जिवंत असते. व त्यातून मनुष्यप्राणी सुखावतो. मग विचार करा कि, झाडे, वेली हे आपल्या पूर्वजासारखे आहेत. मग त्यांचा मान राखायला नको काय?

     



    निसर्ग वाचवा निसर्गाच्या विरुद्ध वागू नका.









      वीस वर्षांपूर्वी पाण्याची बाटली बरोबर ठेवलेली कोणी पाहिली आहे का? तर नाही ना असेच उत्तर येईल. मग या पाण्याच्या बाटलीचा इतका बोलबाला का झाला. तर वाढणारी लोकसंख्या, वाढणारे तापमान, मानवाची जीवनशैलीत बदल, प्रदूषणात झालेली वाढ यामुळे प्रत्येकाला आपल्या सारख्यानाही बाटली ठेवावी लागत आहे. लोकसंख्या वाढल्याने गरजा वाढल्या.  
     
         गरजातून महागाईने डोके वर काढले. महागाईला नावे ठेवून चालणार नाही. मानवी गरजा किती पट वाढल्या ते सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करावा. जमीन तेवढीच पण खाणारी तोंडे वाढली. त्यामुळे कमी पैशात भरपूर वस्तू मिळायच्या पण आज भरपूर पैशात खिशात मावेल एवढ्याच जीवनावश्यक वस्तू मिळू लागल्या. तापमान वाढीचा परिणाम सर्वच घटकांवर झाला. तलावे, विहिरी, आतु लागल्या. भूगर्भातील पाणी संपू लागले. 
     
       त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढू लागले. पूर्वी लोट्याने पिले जाणारे पाणी आज कपाने पाणी प्यायची वेळ येऊन ठेपली आहे. तर जनतेने निसर्गाला वाचविण्याचा विचार केला पाहिजे. निसर्गावर जेवढे तुम्ही हुकूमत गाजवाल तेवढे बरबाद हो जाल. निसर्ग वाचवा, जंगले वाचवा, पाण्याचा जपून वापर करा, प्रदूषण करू नका. पर्यावरणाचा जितका सांभाळ करता येईल तेवढा करा. 
     
     नाहीतर निसर्गापासून आपला उगम झाला आहे त्या निसर्गातच आपला ऱ्हास होताना पाहू नका.


    पर्यावरणाचे रक्षण आपत्तीपासून संरक्षण



    कोणतीही संकटे कधी सांगून येत नसतात. संकटे अनेक प्रकारची रूपे घेऊन येत असतात. कोल्हापूर-सांगलीचा प्रलयंकारी महापूर बघता बघता साऱ्या शिवारात व गावा-शहरात पसरला. लोकांची भंबेरी उडवून टाकली तरी नदीकाठी असणारी वस्ती व गावे यांनी आता समजून चालावे की, जून ते सप्टेंबर महिने आपली घात मास आहेत



    पर्यावरणाचे रक्षण आपत्तीपासून संरक्षण
    पर्यावरणाचे रक्षण आपत्तीपासून संरक्षण



    मेघराजा नद्या, तळी, तलाव, ओढे सर्वकाही भरून टाकतो पण आपल्या घरची ‘घागर’ रिती ठेवतो असा निसर्ग चमत्कार असतो. पण यात मेघराज्याचा दोष तो कोणता? अहो तो तर बसणारच. तरीही हवा-पाणी-आग याची कोणी परीक्षा घेऊ नये, निसर्गाच्या आडवे येऊ नये, निसर्गाला आपल्या मार्गे जाऊ द्यावे. घरे, बांध, धरणे बांधताना याचा दहा वेळा विचार व्हावा व सुरक्षित जागांचा आसरा शोधावा, पाहू या ! पुढील वर्षात याच घातमासात’ आपण कसे वागतो ते?



    झाडांचा अपमृत्यू टाळा.





            सध्या जुनी जीर्ण झालेली झाडे बुंध्याला गिरमिटच्या साहाय्याने छिद्रे पाडून ती झाडे जीर्ण केली जात आहेत. त्यामुळे ही झाडे वाळू लागतात. त्यानंतर त्या झाडाला आग लावून ती झाडे तोडली जातात. त्यांच्याभोवती असणारी झाडे अशीच तोडली जातात. झाडांचे वय १०० पासून २०० पर्यंत असू शकते. त्यांचे जतन केले पाहिजे. व ही झाडे आपली महापुरुष समजून त्यांचे जतन केले पाहिजे

     

           वृक्षारोपणाचे महत्त्व सांगता सांगता जंगले उघडी बोडकी होऊ लागली. गावागावातल्या वनराया तोडून नष्ट केल्या जावू लागल्या. आज वड, पिंपळ, उंबर, बेल वगैरे झाडे दिसेनाशी झाले आहेत. त्यामुळे देवस्थानच्या आसपास असणारा पक्षांचा थवा पहावयास मिळत नाही. 

     

         त्यामुळे पशुपक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळेही डेरेदार झाडे तोडल्याने आज विसाव्याची सावलीच नाहीशी होत आहे. त्यामुळे वनविभागाने असे कृत्य करणाऱ्यांना जबर शिक्षा केली पाहिजे. व जीवसृष्टी वाचवली पाहिजे.



    COMMENTS

    Name

    Bharat,4,English,34,Hindi,36,Jag Duniya,6,Marathi,24,Moulik Vichar,8,
    ltr
    item
    MyselfEssay: निसर्ग माझा मित्र
    निसर्ग माझा मित्र
    nisarg maza mitra, nisarg apala sobati, nisarg vachava, paryavbanache rakshan, झाडांचा अपमृत्यू टाळा,
    https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgtT2TqIoSNMWKDbne3LOg4-4WWr6udDfC_yz2CIc8BOnsem8SgBlpqzmHeQ5ifalJKGJsUhk3Jj1IY904xTGl3wvY4cd1VLcRRxk9Hl-BoGDQF0u77UGR_f5IAVJY7Tf-wgiVLwEwafehC/s640/nature.jpg
    https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgtT2TqIoSNMWKDbne3LOg4-4WWr6udDfC_yz2CIc8BOnsem8SgBlpqzmHeQ5ifalJKGJsUhk3Jj1IY904xTGl3wvY4cd1VLcRRxk9Hl-BoGDQF0u77UGR_f5IAVJY7Tf-wgiVLwEwafehC/s72-c/nature.jpg
    MyselfEssay
    https://www.myselfessay.com/2020/05/nisarg-maza-mitra.html
    https://www.myselfessay.com/
    https://www.myselfessay.com/
    https://www.myselfessay.com/2020/05/nisarg-maza-mitra.html
    true
    3476857798770109658
    UTF-8
    Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content